कासोदा ( प्रतिनिधी ) – कासोदा येथील संत रोहिदास नगरमधील अंगणवाडीशेजारी कैलास बालकिसन अग्रवाल यांनी केलेले अतिक्रमण पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकासह गटविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी ग्रामस्थांनी केली आहे
पत्रकार जितेंद्र ठाकरे यांनी कासोदाचे ग्राम विकास अधिकारी यांना तोंडी व लेखी तक्रार केली होती. ग्रामपंचायतने फक्त तक्रारदाराचे समाधान व्हावे या हेतूने दोन थातूरमातूर नोटिसा देऊन वेळ मारून नेली अंगणवाडीचे बांधकाम कासोदा ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना करण्यात आले होते. त्यावेळेस ग्राम विकास अधिकारी के.डी.मोरे कार्यरत होते आजपण तेच ग्राम विकास अधिकारी आहेत. त्यांनी अतिक्रमणधारकांकडून आर्थिक देवाण-घेवाण करून घेतलेली दिसत आहे. तक्रारदाराने त्यानंतर एरंडोलचे गट विकास अधिकारी यांच्याकडे 3 जानेवारीरोजी तक्रार केली. त्यांनी चौकशी अधिकारी नेमून 9 फेब्रुवारी रोजी चौकशी अधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी पाठवले. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. या ३ अधिकाऱ्यांनी संगनमत करून घेतल्याचे दिसत आहे.
तक्रारदार ठाकरे यांनी जिल्हाधिकारी , जि प चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ( चौकशी अधिकारी), गट विकास अधिकारी यांना निलंबित करून अतिक्रमण काढण्याची मागणी निवेदनात केली आहे.