अमळनेर(प्रतिनिधी )- नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ६५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दुदैवी घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे.
विष्णू रामदास चौधरी (वय-६५) रा. कळमसरे ता. अमळनेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
विष्णू चौधरी हे आपल्या कुटुंबियासह राहत असून त्यांनी ८ रोजी नित्य नियमानुसार मंदीरावर जावून सर्वांची विष्णू चौधरी यांनी भेट घेतली. दुपारी कुणीही नसतांना त्यांच्या पिठाच्या गिरणीच्या स्टोअर रूममध्ये जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
याप्रकरणी देवीदास चौधरी यांच्या ख़बरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सुनील तेली करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठा भाऊ नथ्थू चौधरी, मुलगा विकास, सुन नातवंडे व तीन मुली असा परीवार आहे.