मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील दुर्दैवी घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) – तालुक्यातील उचंद येथील एका २५ वर्षाच्या युवकाने युवतीची सतत लग्न करण्याच्या मागणीला कंटाळून पूर्णा नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होता आहे .
अजय सिताराम इंगळे (वय-२५) असे मयत युवकाचे नाव आहे.
तो आपल्या परिवारासहउचंदा येथे राहत असून त्याच्या गावातील २८ वर्षीय युवतीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करीत होती. याला अजय याचा साफ नकार होता.मात्र लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाहून अजयने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताचा भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरूणीवर मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.