जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या लमांजन येथील शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाल्याची घटना आज घडली . या अनपेक्षित घटनेमुळे लमांजन गावावर शोककळा पसरली आहे .
जळगाव तालुक्यातील लमांजन येथील रहिवाशी कैलास शामराव कोळी ( वय ४८ ) यांचे शेतातच निधन झाल्याचे आज पहाटे उघडकीस आले . ते काल रात्री शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते . पण शेतातुन लवकर घरी परत आले नाही म्हणून त्यांचा पुतण्या समाधान कोळी व मुलगा नाना कोळी हे सकाळी ४ वाजता शेतात गेले होते त्यावेळी ते शेतातच बेशुद्ध अवस्थेत पडलेले या दोघांना दिसले. त्यांनतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले लमांजन येथे दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . त्याच्या पश्चात आई, पत्नी २ मुली २ मुले आहेत