अमळनेर आगारातील चौघांचा समावेश
मुंबई ( वृत्तसंस्था ) – आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत, राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.यात अमळनेर आगारातील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे , असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम आहेत. एसटी वाहतुक ठप्प असून, सणासुदीच्या काळात सामान्यांना याचा फटका बसला आहे.
राज्यभरातील १६ विभाग, ४५ आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. नाशिक विभागातील कळवण आगारातील १७ , वर्धा विभागातील वर्धा आणि हिंगणघाट आगारामधील ४०, गडचिरोली विभागातील अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील १४ , चंद्रपुर विभागातील चंद्रपुर, राजुरा, विकाशा आगारातील १४ , लातुर विभागातील औसा, उदगीर, निलंगा, अहमपुर, लातुर आगारातील ३१ , नांदेड विभागामधील किनवट, भोकर, माहुर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलुर आगारातील ५८ , भंडारा विभागामधील तुमसर, तिरोडी, गोंदिया आगारामधील ३० सोलापुर विभागातील अक्कलकोट आगारामधील २ , यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील ५७ , औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-१ आगारातील पाच , परभणी विभागातील हिंगाली व गंगाखेड आगारातील १० , जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील १६ , नागपूर विभागामधील गणेपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमान नगर आगारातील १८ , जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार , धुळे विभागातील धुळे आगारातील दोन , सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपुर,आटपाडी आगारातील ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.







