जळगाव ( प्रतिनिधी ) – रावेरच्या दिशेने जाणाऱ्या दोन महेंद्र पिकअप गाड्यांची पाल पोलिसांनी झडती घेतल्यावर कत्तलीच्या उद्देशाने १३ गुरे कोंबुन नेले जात असल्याचे स्पष्ट झाले होते पोलिसांनी कारवाई करीत या गुरांची सुटका केली
ही कारवाई फौजदार राजेंद्र राठोर, पो. कॉ. दिपक ठाकुर, पो. कॉ. नरेंद्र बाविस्कर यांच्या पथकाने केली आहे. गुरांना जळगाव येथील बाफना गौ-शाळेत रवाना करण्यात आले
पाल पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मोरव्हाल नजिक सापळा रचुन दोन महेंद्र पिकअप (एम.एच ०४ जि.एफ १८६०) व (एम.एच ०४ जि.एफ ८७६७ ) या दोन्ही गाड्या पकडण्यात आल्या. मध्य प्रदेशातुन मोठ्या प्रमाणात पालमार्गे गुरांची तस्करी होत असते याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी पशुप्रेमी करत आहेत .