मुंबई ( प्रतिनिधी ) – दिवाळी पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकण व गोव्यात येण्या – जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला ३० ऑक्टोबररोजी या रेल्वे गाड्या सुटणार असुन शेगांव थांबा असल्याने अकोला ते रत्नागिरी जाण्यासाठी गाडी उपलब्ध झाली आहे.
ही रेल्वे ०१२३९ नागपूर रेल्वे स्थानकावरून १५.५० वा सुटेल व दुसर्या दिवशी करमाळी येथे १४.१५ पोचणार आहे परतीच्या प्रवासाकरीता ०१२४० ही विशेष गाडी ३१ ऑक्टोबर रोजी करमाळी स्थानकावरून २०.४० वा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०.१० वा नागपूर येथे पोहोचेल . या रेल्वेला वर्धा, बडनेरा जं, अकोला जं, शेगांव, भुसावळ जं, नाशिक रोड, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ रोड, सावंतवाडी रोड, थिवीम स्थानकावर थांबे आहेत.
ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष व दापोली शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र पेठकर यांनी डिव्हिजन रिजनल मॅनेजर यांच्याकडे केली आहे कल्याण – सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई गृपचे संपर्कप्रमुख वैभव बहुतूले व पेण तालुकाध्यक्ष हर्षद भगत यांनी पेण थांब्याची मागणी केली आहे.