चाळीसगाव ( प्रतिनिधी ) — विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या दाखल्याबरोबर पुरावा जोडूनही दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने दाखला तातडीने दिला जावा अशी मागणी दिनकर राठोड यांनी उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळानंतर विजाभजा व बंजारा जमातीचे दाखला काढण्यासाठी सन: १९६१ चा पुरावा जोडण्यात येत आहे . मात्र दाखला काढण्यासाठी हा पुरावा जोडूनही वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हि गंभीर बाब लक्षात येताच विजाभजा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी सहकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात देशाला स्वातंत्र्य मिळायला ७५ वर्षे झाली. परंतु हल्ली विजाभजा जमातीचे दाखले काढण्यासाठी खूप झटावे लागते. पुरावा मिळाला नाहीतर सामान्य माणसांची पिळवणूक होते. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळेवर जातीचा दाखला न मिळाल्यामुळे शिक्षणापासून मुकावे लागले आहे. त्यामुळे हि जाचक अट रद्द करण्याची मागणीही करण्यात आली त्यामुळे जातीचा दाखला तातडीने दिला जावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी केली आहे. निवेदनावर विजाभजा आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनकर राठोड, माजी पं.स. सदस्य बापूराव पाटील, सरपंच महेंद्रसिंग राठोड (सांगवी), उपसरपंच आनंदा राठोड, ग्लोबल बंजारा अस्तित्वचे अशोक राठोड, माजी उपसरपंच देवीदास राठोड व करगांव वि.सो.चे चेअरमन बाबूराव मराठे आदींच्या सह्या आहेत.