रावेर ( प्रतिनिधी ) — शहरातील भर वस्तीत अज्ञात हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याने शेळ्या ठार झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली वन खात्याने दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
रावेर शहरात मध्यरात्री अज्ञात हिंस्र प्राण्याने पाळीव शेळ्यांवर जिवघेणा हल्ला केला . यामध्ये अनेक शेळ्या मृत्यूमुखी पडल्या .असे हल्ले अनेक दिवसांपासुन होत असून हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.रावेर शहरातील सावदा रोडनजिक मध्यरात्री हिंस्र प्राण्याने पाळीवर शेळ्यांवर जिवघेणा हल्ला केला. हल्ल्याची बातमी मिळताच वनपाल अतुल तायडे घटनास्थळी पोहचले अज्ञात हिंस्र प्राण्याचा शोध घेत आहेत. परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.