चाळीसगाव (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांना दैनंदिन काळात येणाऱ्या अनेक समस्या असतात मात्र त्यांना शासन व प्रशासना मार्फत न्याय मिळत नसल्याने शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेच्या वतीने आंदोलनाद्वारे आवाज उठवून सर्व सामान्य घटकांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे कार्य रयत सेनेच्या माध्यमातून गेल्या १० ते १२ वर्षांपासून सातत्याने करीत आहोत. तरुणांना रयत सेनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविणार असल्याचे प्रतिपादन रयत सेना संस्थापक गणेश पवार यांनी खरजई येथे दि १० रोजी रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
ग्रामीण भागात शेतीवर अनेक कुंटुंब आपला राहाटगाडा चालवितात मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतीवुष्टी तर कधी दुष्काळ या चक्रात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उचविण्यास मदत होऊन कुंटुंबाला मोठा आधार मिळेल. शेतकऱ्यांच्या पाठीशी रयत सेना भक्कमपणे उभी राहिल असे देखील गणेशभाऊ पवार यांनी सांगितले.
तालुक्यातील खरजई येथे दि १० रोजी रात्री ८ वाजता रयत सेना फलकाचे अनावरण गणेशभाऊ पवार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ ( संता पहेलवान ) याची लाभली ,तर कार्यक्रमास जिल्हाअध्यक्ष संजय कापसे,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, छोटु अहिरे, विलास मराठे अदि उपस्थित होते .खरजई रयत सेना शाखेच्या अध्यक्षपदी गणेश पवार, उपाध्यक्ष दिपक एरंडे , कार्याध्यक्ष अजय एरंडे, संघटक मयुर म्हस्के, सचिव तात्याजी गुंजाळ , सहसंघटक मयूर सूर्यवंशी, सहकार्याध्यक्ष बुध्दराज मोरे, सहसचिव मंगेश केदारे, कोषाध्यक्ष भूषण गोरे,समन्वयक वैभव एरंडे यांची निवड रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी जाहीर करून रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी गणेश पवार पुढे बोलताना म्हणाले की कोरोना बाधीत रुग्नाना रुग्णालयात भरती करून अनेक कुंटुंबाना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केली , वडीलांची हालाखीची परीस्थिती नसल्यामुळे बालकांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयाचे बिल भरण्यास आर्थिक मदत ,गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,रस्ते अपघातग्रस्ताना घटनास्थळी जाऊन संकट काळात सहकार्य करून रुग्णवाहिकेतुन रुग्णालयात भरती करण्यास आर्थिक मदत ,कोरोना काळात गोरगरीबाना धान्य वाटप , मोफत सॅनेटायजर्स व मास्क वाटप,कोरोना काळात रक्ताचा तुटवड्यामुळे रक्तदान शिबीर असे विविध जनकल्याणकारी कार्य रयत सेना सामाजिक भान जोपासत कार्य सातत्याने करत आहे. शेतकरी,आरोग्य, कष्टकरी,विद्यार्थी,महिलांच्या न्यायाकरीता संघटना सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहुन समाजहित जोपासत असते . यापुढेही खरजई गावासह ग्रामीण भागातील विविध समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेना अग्रेसर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ ( संता पहेलवान ) याप्रसंगी बोलताना म्हणाले की रयत सेना सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणारी संघटना आहे. अन्यायाविरोधात संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे .दहा ते बारा वर्षाच्या मुलाच्या श्वास नलिकेत बोंड अडकले होते मुलाच्या वडीलानी अनेक रुग्णालयात जाऊन उपचार व्हावा यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर आदिवासी परिवारातील बांधव संता पैलवान यांच्याकडे आले आणि त्यांनी तात्काळ डॉक्टर देवरे हॉस्पिटलला जाऊन डॉक्टर देवरे यांना विनंती करून त्या मुलाच्या श्वास नलिकेत बोंड काढण्यात आल्याने मुलाचे प्राण वाचले मात्र आदिवासी कुंटुंबाकडे रुग्णालयाचे बिल भरण्यास पैसे नव्हते ते बील देखील रयत सेनेने भरून माणुसकी दाखविली.
खरजई गावासह ग्रामीण भागात अनेक समस्या असून त्या तडीस नेण्यासाठी रयत सेना काम करेल.अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघटना लढा उभारुन न्याय देण्याचे काम करीत असल्याचे सांगत ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येला प्राधान्य देवून समस्या तडीस नेण्याचे काम रयत सेनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सरपंच आनंदा जाधव,एकलव्य सेनेचे जिल्हाअध्यक्ष प्रवीण मोरे ,समाधान एरंडे,भगवान एरंडे, सतीश मुलमुले, मधुकर एरंडे, तात्याजी गुंजाळ, भावडु काळे,नितीन एरंडे, सुनील एरंडे, समाधान म्हस्के, सुरेश काळे यांच्यासह खरजई येथील ग्रामस्थ व रयत सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोरे यांनी केले.