चहुत्रे ता. पारोळा (प्रतिनिधी) ;- येथे तीव्र कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यासाठी चुहत्रे येथील महिला आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पारोळा तालुका यांनी एकत्र येत गटविकास अधिकारी पारोळा यांना निवेदन दिले.
चहुत्रे येथे तब्बल २महिन्या पासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी लहान मुले, महिला याना वणवण भटकंती करावी लागत आहे. तर काहींना विकत पाणी घ्यावे लागत आहे.
गावासाठी पाण्याच्या तीन टाक्या असून विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. सरपंच ,ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांच्या गलथान कारभारा मुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अखिल भारतीय भ्रष्टचार निर्मूलन संघर्ष समिती चे महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील यांनी सरपंच आणि ग्रामसेवक याना या विषयी जाब विचारला असता मोटार खराब आहे, विहिरीत पाणी नाही, पाईप फुटला आहे अशी उडवा उडवी ची उत्तरे दिली जात आहेत.तरी बीडीओ साहेबांनी याबाबत दखल घेऊन चहुत्रे गावाचा पाणी प्रश्न मार्गी लावावा या साठी चहुत्रे गावातील महिला, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती ने एकत्र येत निवेदन दिले.
येणाऱ्या३-४दिवसात निवेदनाची दखल न घेतल्यास पंचायत समिती पारोळा येथे हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील यांनी दिला आहे. यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे जिल्हाध्यक्ष-महेश पाटील, विभागीय अध्यक्ष-जितेंद्र वानखेडे, महिला तालुकाध्यक्ष-शोभा पाटील, महिला शहराध्यक्ष-ऍड स्वाती शिंदे,पार्वतीबाई खैरनार, भरती भिल, दगुबाई भिल, अनिता वारुळे, मंगल गायकवाड, राधा भिल, कोकीलाबाई भिल, योगिता गायकवाड, शारदा भिल उपस्थित होते.