राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचा आरोप
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- महापालिकेतर्फे वॉटरग्रेस कंपनीला ठेका देण्यात आला असून मनपा मालकीचे वाहनेसुद्धा देण्यात आली आहे. मात्र मनपा आणि
वॉटरग्रेसमध्ये झालेल्या करारनाम्यात किरकोळ किंवा मोठ्या नुकसान किंवा दुरुस्तीचा खर्च हा वॉटरग्रेसने करावा हे नमूद असतानाही याचा खर्च मनपा करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केला असून यामुळे मनपा वॉटरग्रेसवर का मेहेरबान होत आहे असा सवाल करून यामुळे जनतेच्या पैशांची सामूहिक लूट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अभिषेक पाटील यांनी म्हटले आहे कि, ४ मे २०२१ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत संविदेत मुद्दा क्र ८ मध्ये सदरील वाहनांच्या लोखंडी कप्पे सुधारण्यासाठी १३ हजार ९०० याप्रमाणे ८५ वाहनांच्या दुरुस्तीसाठी ११, ८१,५०० रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
अभिषेक पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न – मनपाची वाहने आरोग्य विभागाने जीएम पोर्टलवरून खरेदी करीत असताना ही बाब लक्षात कशी आली नाही ? (कप्पे कसे हवेत ), दुरुस्तीचा खर्च हा वॉटरग्रेसकडून का घेतला गेला नाही ? जळगावकर यांनी भरलेल्या कराची अशीच उधळपट्टी चालणार का ?
वॉटरग्रेसवर इतकी मेहरबानी का ?अशा लहान लहान चोऱ्या करूनच याचा आकडा मागे झालेल्या घोटाळ्यासारखा तर होणार नाही ? ज्या अधिकाऱ्यांची या प्रकाराला मूक संमती होती त्यांची चौकशी का होऊ नये असा सवालही अभिषेक पाटील यांनी उपस्थित केला आहे.