जळगाव( प्रतिनिधी ) ;- जेवणानंतर घराबाहेर फेरफटका मार्ट असलेल्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून दोघांनी दुचाकीवरून पळ काढल्याची घटना समता नगर भागात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश भगवान सोनार (वय-४७) रा. साई मंदीराजवळ समता नगर, हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. १२ जानेवारी रोजी रात्री १०.४५ वाजता जेवण आटोपून शतपावली करण्यासाठी समता नगर ते संभाजी नगर रोडवर हातात मोबाईल घेवून पायी निघाले. ११ वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत असतांना संभाजी नगरकडून एका दुचाकीवर दोन जणांना अचानक येवून कानाला लावलेला मोबाईल हिसकावून दुचाकीने महाबळकडे पळाले. त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाही. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे.








