जिल्ह्यातील चार तालुके निरंक ;

धरणगाव, भडगाव कोरोना मुक्तीकडे
जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या अहवालात आता रूग्ण संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. आज जिल्ह्यात ३८ रूग्ण आढळून आले आहेत तर ४० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण आकडा ५३९८९ वर पोहचली आहे, यापैकी ५२३३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ३७३ रूग्ण उपचार घेत आहे. २ रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
जळगाव शहर १२, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ६, अमळनेर १, चोपडा ३, पाचोरा १, यावल १,एरंडोल १,जामनेर १, रावेर ६,चाळीसगाव ३, मुक्ताईनगर १, इतर जिल्हा ० तर भडगाव, धरणगाव,पारोळा, बोदवड तालुक्यात रूग्ण संख्या निरंक आढळून आली आहे.तर धरणगाव (१), भडगाव (३), जळगाव ग्रामीण (४), बोदवड (६), पारोळा (९) हे तालुके कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहेत.







