पाचोरा ( प्रतिनिधी) – येथील पाचोरा पंचायत समितीसमोर घरकुलासाठी आमरण उपोषण करणाऱ्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी मागे घेतले.


पाचोरा तालुक्यातील ओझर मौजे येथील रहिवासी ज्ञानेश्वर हिरामण सोनवणे, सिध्दार्थ शांताराम गायकवाड, राजाराम संभाजी सोनवणे,गोपाल दाजीबा सोनवणे, म्हाळसाबाई अशोक सोनवणे यांचे रमाई व शबरी घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर असून “ड” यादीमध्ये नाव असुन ३ वर्षापासून हे लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. म्हणून दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती, पाचोरा समोर सरकारी सुचनांचे पालन करत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आले होते. जो पर्यंत मागणी पुर्ण होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला होता. मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सभापती वसंत गायकवाड, माजी सभापती सुभाष पाटील, बीडीओ अतुल पाटील यांनी लेखी आश्वासन दिले. त्यावेळी तालुका सरचिटणीस शेलार ,प्रदिप पाटील, उपस्थित होते. लेखी घेतल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.







