अमळनेर (प्रतिनिधी) –पंत्रप्रधान मोदी हे राज्यांना विश्वासात न घेता, संविधानाने ठरवून दिलेल्या संघ राज्याची रचनेचा आदर न करता राज्याशी योग्य सल्लामसलत न करता आडमुठा कारभार करत असल्याचा आरोप युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केला आहे. तसेच विविध मागण्यासाठी अमळनेर तहसीलदार यांना युवक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, अंतिम सत्राच्या परीक्षा असो वा नीट व जीई परीखेचा निर्णय असो वा राज्याना जीएसटीमधील द्यावयाच्या कराचा वाटा असो जीएसटीचा योग्य तो वाटा न मिळाल्याने राज्याची आर्थिक स्थिती बेतास जात आहे. खरे तर केंद्र सरकारने कोरोनाच्या कठीण समयी
राज्यांना आर्थिक मदत करून सक्षम केले पाहिजे उद्योगधंद्यांना रोख आर्थिक पॅकेज दिले पाहिजे. जेणेकरून रोजगार निर्मिती होईल.
पंत्रप्रधान मोदी यांच्या 20 लाख करोडच्या पॅकेजमधून बेरोजगार युवक, शेतकरी वा लघु – मध्यम उद्योगक्षेत्र यापैकी कोणात्याही घटकास मदत झाली नाही. केंद्र सरकार बिगर भाजप शासित राज्याची आर्थिक कोडी करण्यात धन्यता मनात आहे. अशा परिस्थितीत बिगर भाजप शासित राज्यांना कारभार चालवणे मुश्किल होऊन बसले आहे. सरकारी आस्थापनांचे खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा रा.स्व. संघाचा अजेंडा मोदी पूर्णत्वास नेत आहेत.
पंतप्रधान मोदींनी हे सर्व करण्यापेक्षा दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जागून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे. युवक हे निराश झाले आहेत. आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची स्वतःची जबाबदारी ढकलून चालणार नाही. मोदी सरकारकडे आमची एकाच मागणी आहे. रोजगार दो असे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केली आहे.
यावेळी युवक काँग्रेस जळगाव जि.अध्यक्ष प्रा.हितेश पाटील, महिला जिल्हाअध्यक्षा सौ.सुलोचना ताई वाघ, अमळनेर युवक कौग्रेस शहर.अध्यक्ष तौशिफ तेली, अमळनेर शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक सईद तेली, तालुका सरचिटणिस संतोष पाटील, राजु शेख, अयुब ट्रेलर राहूल गांधी विचारमंच जिल्हा अध्यक्ष रहेमान खाटीक, अमळनेर ता.अध्यक्ष.राकेश पाटील नगरसेवक नरेंद संदानशिव समिर शेख हर्षल जाधव कुणाल पाटील ईद्रीस भागवान युसुफ पठाण, राजू पाटील, मनोज बोरसे, घनशाम महाजन ई.कार्यकर्त ऊपथ्तित होते व आदींच्या निवेदनावर सह्या होत्या.







