
शेतातील गोठ्यातून जनावरे चोरी; ४३ हजारांचा ऐवज लंपास
कासोदा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा; तपास सुरू
जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरात शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेली बैल, गायी व गोरे अशी एकूण ४३ हजार रुपये किमतीची जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलियास खान युसुफ खान (वय ३०, रा. बेलदार मोहल्ला, कासोदा, ता. एरंडोल) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांची जनावरे कासोदा गावाजवळील पारोळा रस्त्यालगत गट क्रमांक २४ व २५ मधील शेतातील गोठ्यात बांधून ठेवण्यात आली होती.
दि. ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ ते दि. ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून जनावरे चोरून नेली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेली जनावरे
एक बैल – किंमत २०,००० रुपये
दोन गायी – प्रत्येकी ८,००० रुपये (एकूण १६,००० रुपये)
दोन गोरे – अनुक्रमे ४,००० व ३,००० रुपये
अशा प्रकारे एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक १०५/२०२६ नोंद करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









