जळगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषद संपन्न
जळगाव(प्रतिनिधी):- पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवणे काळाची गरज असून, निसर्ग मित्र समितीचे या क्षेत्रातील कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे, असे गौरवौद्गार आमदार किशोर दराडे यांनी काढले. जळगाव येथील अल्पबचत भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे आयोजित ‘राज्यस्तरीय पर्यावरण परिषद व महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

महाराष्ट्र शासन ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार’ प्राप्त निसर्ग मित्र समिती (जळगाव) आणि सार्वजनिक सेवा मंडळ (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने, स्व. आबासो रघुनाथ आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ १ मार्च रोजी या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षपूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आ. किशोर दराडे, आ. सुरेश भोळे, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, शशिकांत पाटील (नाशिक), सुभाष बिंदवाल, डी. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. ज्यात
वृक्ष लागवड व संवर्धन, फटाकेमुक्त दिवाळी आणि प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणपूरक होळी आणि शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर, ‘गुढीपाडवा – कडुलिंब वाढवा’ मोहीम.
ओझोन थराचे रक्षण व जनजागृती असे ठराव झाले. यावेळी उपस्थित सर्वांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.
पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ५० व्यक्तींना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
प्रमुख पुरस्कार विजेते
जीवन गौरव पुरस्कार: शशिकांत भदाणे (धुळे), प्रकाश अमृत पाटील (से.नि. पोलीस अधिकारी, जुवार्डी), प्रभाकर वाघ (से.नि. वन अधिकारी).
महाराष्ट्र भूषण पुरस्कार: विनोद पवार (जळगाव), गणेश सजनराव पिंगळे (RTO इन्स्पेक्टर), भिकूबाई सोनवणे (चोपडा), दिलीप मनसाराम पाटील (निंभोरा), प्रदीप गहीवरे (शिरपूर), राजेश पवार (बडोदा), अमोल घुगे (ट्रॅफिक पोलीस, जळगाव) यांच्यासह शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन राज्य महासचिव संतोषराव पाटील यांनी केले. आभार आर. आर. सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेंद्र घोलप, विश्वास पगार, नामदेवराव तुपे, डॉ. वाल्मीक अहिरे, विनोद पाटील यांच्यासह निसर्ग मित्र समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.









