पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील बांबरुड राणीचे येथील कर्जबाजारीपणामुळे तसेच शेती पिकांचे अतिनुकसान झाल्यामुळे येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
तरुण शेतकरी अनिल जयसिंग राजपूत (वय वर्ष ४८) आपल्या परिवाराचा उदरनिर्वाहासाठी शेतीसोबतच टेलर कामाचा व्यवसाय करत होता. परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाच्या मनमानीपणामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपल्या शेतातील एक परिस्थिती पाहत व झालेले नुकसान पाहून दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी विषारी औषध सेवन केले. त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना दि. १४ रोजी त्यांचे निधन झाले.
दिवाळीच्या उत्सवात कर्जबाजारीपणामुळे अनिल जयसिंग राजपूत या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिवारावर मोठा आघात होऊन दुःखाचा डोंगर कोसळला मयताच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, भाऊ, पत्नी असा मोठा परिवार आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत शेतकऱ्याच्या वारसाला शासकीय मदत मिळावी अशी ग्रामस्थातर्फे मागणी करण्यात येत आहे.