जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी नयन लालवानी हिने भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र आयोजित मॉक पार्लियामेंट या विषयावरील वादविवाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत यश प्राप्त केले आहे.
ही स्पर्धा दापोरीकर हॉल जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. ६० सहभागीं पैकी, नयन लालवानी हिने एकूण दुसरा क्रमांक तर विरोधी पक्षातून पहिला क्रमांक मिळवला. तिने या मॉक पार्लमेंटमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले आणि आपत्कालीन स्थितीला पाठिंबा दिला. या सत्रामध्ये १९७५ ते १९७७ कालखंड पुन्हा उभा करण्यात आला होता, जिथे भाजप सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस विरोधी पक्ष होता.हा कार्यक्रम भारतीय संविधानावर आधारित संसद सत्राच्या स्वरूपात आयोजित केला गेला होता. प्रत्येक सहभागीला ९० सेकंदांचा वेळ दिला गेला होता आपले विचार मांडण्यासाठी. इतर स्पर्धकांच्या मतांवर शंका व्यक्त करायची असल्यास, सहभागींना आपला क्रमांक असलेली बॅच उचलून प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. एकूण दोन सत्रांमध्ये ही प्रक्रिया पार पडली.विशेष अतिथी म्हणून विश्वास कुलकर्णी उपस्थित होते, ज्यांनी आपत्कालीन काळात कारावास भोगलेला असून, त्या अनुभवाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.या कार्यक्रमासाठी प्रा. नकुल गाडगे व प्रा. वेलचंद होले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तृतीय वर्ष बी.टेक.चा विद्यार्थी चेतन बाविस्कर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले.या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, बेसिक सायन्सेस आणि ह्युमिनिटीज विभागाचे प्रमुख डॉ. नितीन भोळे सर, तसेच प्रथम वर्षाचे सर्व प्राध्यापक व सर्व शाखांचे विभागप्रमुख यांनीही नयनचे हार्दिक अभिनंदन केले.
ही स्पर्धा दापोरीकर हॉल जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. ६० सहभागीं पैकी, नयन लालवानी हिने एकूण दुसरा क्रमांक तर विरोधी पक्षातून पहिला क्रमांक मिळवला. तिने या मॉक पार्लमेंटमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले आणि आपत्कालीन स्थितीला पाठिंबा दिला. या सत्रामध्ये १९७५ ते १९७७ कालखंड पुन्हा उभा करण्यात आला होता, जिथे भाजप सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस विरोधी पक्ष होता.हा कार्यक्रम भारतीय संविधानावर आधारित संसद सत्राच्या स्वरूपात आयोजित केला गेला होता. प्रत्येक सहभागीला ९० सेकंदांचा वेळ दिला गेला होता आपले विचार मांडण्यासाठी. इतर स्पर्धकांच्या मतांवर शंका व्यक्त करायची असल्यास, सहभागींना आपला क्रमांक असलेली बॅच उचलून प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. एकूण दोन सत्रांमध्ये ही प्रक्रिया पार पडली.विशेष अतिथी म्हणून विश्वास कुलकर्णी उपस्थित होते, ज्यांनी आपत्कालीन काळात कारावास भोगलेला असून, त्या अनुभवाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.या कार्यक्रमासाठी प्रा. नकुल गाडगे व प्रा. वेलचंद होले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तृतीय वर्ष बी.टेक.चा विद्यार्थी चेतन बाविस्कर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले.या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, बेसिक सायन्सेस आणि ह्युमिनिटीज विभागाचे प्रमुख डॉ. नितीन भोळे सर, तसेच प्रथम वर्षाचे सर्व प्राध्यापक व सर्व शाखांचे विभागप्रमुख यांनीही नयनचे हार्दिक अभिनंदन केले.