जामनेर तालुक्यात विद्यार्थ्यांचे जल्लोषात करण्यात आले स्वागत
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाळी दिगर येथे दि. १६ जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.सुरवातीला इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक संदिप पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी शालेय गुणवत्ता विकास,विद्यार्थी उपस्थिती,पालक सहभाग,शासनाच्या विविध योजनांबद्दल पालकांना माहिती दिली.यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक, गणवेश, बूट व पायमोजे वाटप करण्यात आलेत. शालेय पोषण आहारासोबत विद्यार्थ्यांना गोड खाऊ सोनपापडी देण्यात आली. कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान सांगळे, उपाध्यक्षा पुष्पा गोसावी, गावाचे सरपंच संजय बनसोडे, गावातील पदाधिकारी व नागरिक मधुकर आवटे, गावाचे पोलीस पाटील संदिप सावळे, शकील तडवी, गुलाब तडवी, प्रकाश गोसावी, माजी सदस्य राहुल शिनगारे, गजानन खर्चाने, प्रदिप मोरे, विशाल आवटे, अकबर तडवी, आशा सेविका ज्योती कुचेकर शाळेचे माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपार सत्रात वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख हेमंत पाटील यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.