जिल्हा पणन अधिकाऱ्यांची माहिती
अमळनेर (प्रतिनिधी) :- खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीवर सुरू असलेल्या तुर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ही खरेदी आता २८ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील १६ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी सादर करता येणार आहे.
नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव येथे ही खरेदी सुरू आहे. आधारभूत किंमतप्रमाणे तुर खरेदीचा दर रु. ७५५०/- प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील, तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांनी केले असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मोने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.