एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील रिंगणगाव येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उघड झाली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र हिरामण बाविस्कर (वय ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.(केसीएन) रविंद्र बाविस्कर यांच्यावर बँकेचे तसेच सोसायटीचे कर्ज होते. त्यामुळे त्यांनी गुरुवारी त्यांच्या शेतात जाऊन सकाळी ९ ते १०च्या दरम्यान फवारणीचे विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरुवातीला जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची प्राथमिक नोंद जळगाव शहर पोलीस स्टेशनला झाली. नंतर शून्य क्रमांकाने एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.