वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – राज्यात वृक्ष लागवडीसाठी लाखो झाडे लावले गेले. नको तेथे झाडे लावले, लावतांना मान्यवरांच्या शुभहस्ते लावले गेलेत. जागतीक ग्लोबलच्या दृष्टी कोणातून झाडे लावणे तेवढेच गरजेचे पण आहे. संकल्पना चांगलीच म्हणावी लागेल. तसा उपक्रम देखील राज्य सरकारने उत्तमरित्या राबविला. मात्र त्या लावलेल्या झाडांचे काय ? नतंर कुणी त्याकडे लक्ष देईना. वृक्षसवर्धन व्हायला हवे पण ते कागदावरच होत आहे. म्हणून लावलेल्या वृक्षांना आधार कुणाचा असे वृक्ष प्रेमींमध्ये बोलले जात आहे.


निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाड टिकवणे व जगवणे हि काळाची गरज आहे . त्यासाठी सरकार देखील विविध प्रकारे उपक्रम राबवीत असते . जसे झाडे लावा झाडे जगवा ! झाडांची कत्तल थांबवा, वनवा लागू नये म्हणून शासनाच्या वतीने काळजी घेतली जाते. जंगल तोड होवू नये वनसंरक्षण केले जाते. एवढे उपाययोजना करून देखील जंगल तोड मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही.
कारण संबंधीत विभागाचे दुर्लक्षामुळे.ज्या प्रमाणात तोड होते त्या प्रमाणात लागवड देखील होत आहे. परंतू संरंक्षण होणे अपेक्षीत आहे. निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा र्हास होत आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे. दगडांच्या खाणींमुळे डोंगरमाथेही उजाड होत आहेत अन् जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे.
बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत, म्हणून या उपक्रमा अंतर्गत गेल्या सरकारने लाखो झाडे लावली . त्यासाठी मोठमोठया जाहीराती झळकल्या. गावातील सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत झाडे लावण्याचे फोटो झळकले. एक झाड लावायला पन्नास लोक,कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व फौज फाटासह स्थानिक राजकीय वारसदार असा जमावळा त्या फोटो मागे साहेंबांसोबत दिसायचे, एक झाड पन्नास आड, असे चित्र राज्याच्या कानाकोप-यात होते.
लाखो झाडे लावली खरी परंतू त्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी कोणीच घेतांना दिसत नाही. जे फोटोत होते ते देखील त्या झाडाकडे ढुंकून पहात नाहीत. किती झाडे जगले किती झाडे मृत झाले . याची ना सरकारला गांर्भीय, ना सरकारी लवाजमाला. लावलेले झाड जगले का मेले. त्याला पाणी घालणे, काही दिवसापर्यंत संरक्षण करणे , पावसाळ्या नतंर पाणी व्यवस्थापनासह कुंपणाने संरक्षण देणे, अशा प्राथमिक गरजा झाडे लावण्यासोबत देणे आवश्यक आहेत. पण तसे काहीच दिसून येत नाहीत. जे जगले ते जगले, बाकी सब राम भरोसे ! या उपक्रमाचा उहापोह जास्तच केला गेला जातो. अमाप पैसा खर्च होतो याचा कोणीच विचार करीत नाहीत. लावलेल्या झाडांची जबाबदारी कुणाची. ग्रामपंचायत पासून ते राज्याच्या वरिष्ठ कार्यालांपर्यंत कोण जबाबदारीनीशी लावलेल्या झाडांची निगा राखतात नाहीत. याची शाहनिशा होणे देखील तेवढेच गरजेचे आहे . मोजक्याच ठिकाणी झाडे दिसून येतील नतंर लागवड केलेली जागेचे नामोनिशान दिसत नाहीत.
चांगली स्तुत्य अशी संकल्पना द्वारे उपक्रम राबवण्याची मोहीम हाती घेतली गेली आहे खरी. पण नतंरची परिस्थिती मन जळवणारी आहे. एकीकडे पर्वतांमध्ये सर्रास डेरेदार वृक्षांची कत्तल सुरूच आहे. नविन वृक्ष लागवड हि दरवर्षाला सुरूच आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याची जी गती आहे. त्या गतीने झाडांची काळजी घेणे पण अती महत्वाचे आहे.
म्हणून जे झाडे लावले आहेत त्याना जगवा, जे जगले आहेत त्याना अजून जगू दया, अन् सर्व झाडे सुरक्षीत जगावेत व रहावेत म्हणून त्यांचे संरक्षण करा!. एवढीच वृक्ष प्रेमींची मापक अपेक्षा आहे.







