जळगांव (प्रतिनिधी) – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गायझेशन जितो लेडीज विंगतर्फे ‘अहिंसा रन’ रविवार दि. २ एप्रिल रोजी ३,५,१० किलोमीटर अंतर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. अहिंसा रन ६५ शहरात एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार आहे. शांती व अहिंसेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने आज दि. ३ मार्च रोजी ‘अहिंसा रन’ चे अनावरण करण्यात आले.
अहिंसा रन जळगांव जितोचे अनावरण हे आयुक्त विद्या गायकवाड, पोलीस अधिक्षक एम जयकुमार, पोलीस उप अधीक्षक संदीप गवित, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, प्रीतम रायसोनी, रमेश जैन, अजय ललवाणी, रजनीकांत कोठारी, राजेश चोरडिया, डॉ. परेश दोशी, विराज कावडीया इत्यादींच्या हस्ते करण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ. सोनाली जैन व सुलेखा लुंकड यांनी केले. जळगांव रनरचे अध्यक्ष किरण बच्छावं, विक्रांत सराफ, कुशल गांधी, अपना राका, गुंजन कांकरिया, संध्या कांकरिया, उषा जैन, अनिमेश संचेती, चेतन जैन, प्रियांशू सुराणा ई. उपस्थित होते.