जळगाव ( प्रतिनिधी ) – न्यायालयाने आदेश देऊनही जागा रिकामी न करता मालकाच्या कुटुंबियांवर जादूटोण्याचे अघोरी प्रयोग करण्याचा प्रयत्न करीत मानसिक छळ करणाऱ्या आरोपींच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अंजली भुसारी यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या पती अँड. केदार भुसारी व मुलगा कार्तिकसह शिवाजीनगरात राहतात . प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी ललिता प्रकाश व्यास, सुशिला गोपाळ पंडित,विद्या गोपाळ पुरोहित, गौरीलाल रुपचंद पुरोहित राहतात. ही जागा आमचे वडीलोपार्जीत असुन माझे आजे सासरे यांनी या तिघांना 40 ते 45 वर्षापासुन वापरण्यास दिलेली होती. त्यानंतर सन 2007 मध्ये माझे सासरे व पती यांनी या लोकांना त्यांना दिलेली जागा खाली करण्यास सांगितले असता त्यांनी जागा खाली केली नाही तेव्हापासुन ते आमचेसोबत वैर भावनेने वागत होते.
त्यानंतर माझ्या पती व सासरे किशोर भुसारी यांनी 2007 मध्ये यांनी जळगांव न्यायालयात जागेचा ताबा मिळेण्याबाबत दिवाणी खाजगी दावा दाखल केला त्याचा निकाल 2017 मध्ये आमचे बाजूने लागल्याने तेव्हापासुन वरील तिन्ही लोक हे आमवेशी वैर भावनेने वागु लागले तेव्हा पासुन हे लोक आमच्या घराच्या दरवाज्याजवळ उडिद, मोहरी , रक्षा टाकुन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत होते. माझ्या पतीच्या सांगण्यावरुन मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते. 3 फेब्रुवारी रोजी मी माझे पती व माझा मुलगा असे आम्ही आमचे नविन घरी शिवाजीनगर येथे रहिवासासाठी गेलो 30 मेच्या अमावस्याच्या रोजी दुपारी मी माझे नेहमी प्रमाणे काम करून घराबाहेर आली असता मला आमचे घराच्या गेटवर कोणीतरी मानवी केस व हळद ककू टाकलेले दिसले. त्यावेळेस आम्ही दोघांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर रात्रीच्या वेळेस लाईट गेलानंतर जनरेटर सुरु होण्याच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसम आमचे घरावर दगड मारत असे आम्ही त्याकडे देखील घटनेकडे दुर्लक्ष केल. काही दिवस गेल्यानंतर 14 जून रोजी पोणीमच्या रोजी सकाळी मी रात्री वाळत घातलेले कपडे काढायला घराबाहेर गेली तेव्हा वाळत घातलेल्या माझ्या गाऊन वर रक्त टाकलेले दिसले ते पाहुन मी घाबरली पण तेव्हादेखील आम्ही दुर्लक्ष केले.
काल ( 28 जून ) दुपारी लाईट गेलेली होती मी पती यांना कोटॉमध्ये डबा देण्यास बाहेर निघाली व आमचे घराचे गेट उघडले तेव्हा गेटवर कणकेचा गोळा त्यावर काळी बाहुली हळद कुंकू वाहिलेली त्यावर पिवळ्या अक्षरामध्ये अंजली नाव लिहीलेली व त्यासोबत मिरच्या बांधलेल्या बाहुलीच्या अंगावर ठिकठिकाणी पिवळ्या रंगानी फुली करून ठिकठिकाणी सुया टोचलेल्या असे येऊन पडले मी पतीला लगेच फोनवरून ही माहिती दिली व त्यानंतर
शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास आली. या आरोपींचा मला घाबरवण्याचा अथवा माझ्या जिवाचे बरे वाईट होण्याच्या उदेदशाने वरील कृत्य केल्याबाबत माझा त्यांचेवर संशय असल्याने माझी बरौल लोकांविरुध्द फिर्याद आहे.