जळगाव (प्रतिनिधी) – हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सध्या धरणाचे चार दरवाजे पूर्ण तर सोळा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून 44821 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने संध्याकाळपर्यंत धरणातून 90 हजार क्युसेसपर्यत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल. असे उपअभियंता श्री. महाजन यांनी कळविले आहे. तरी तापी नदी काठावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







