जळगांव (प्रतिनिधी) – अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेक-यांना हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये प्रमाणे मदत मिळावी. महावितरणकडून शेतक-यांची विज तोडणी तात्काळ थांबवावी. शेती पंपांना १२ तास सुरळीत विज देण्यात यावी. पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार २९ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात विविध बाबींचा उहापोह राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. जिल्ह्यातील सामान्य जनता व शेतकरी महागाईने पिचले आहे. शेत मालाचे दर कमी आहेत. काही तालुक्यांत पिण्याचे पाणी, विज टंचाई, खराब रस्ते अशा अनेक व्याधींनी नागरिक त्रस्त आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पेट्रोल-डिझेल-घरगुती गॅस चे भाव गगनाला भिडत आहेत समान्य जनतेला ते परवडणारे नाही, जिल्हातील प्रमुख पीकांपैकी एक अशा कपाशीला शेतक-यांना परवडेल असा भाव नाही, शेतक-यांच्या उत्पन्न खर्चाचा ताळमेळ बसत नाही.
सामान्य जनता व शेतकरी यांना दिलासा मिळावा म्हणून रास्त मागण्या राज्य सरकारकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत. यात कापसाला किमान बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा. कांद्याला किमान तीन हजार रुपये हमी भाव देण्यात यावा. सिएमव्ही रोगामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेक-यांना हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये प्रमाणे मदत मिळावी, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.
नियमीत कर्जफेड करणा-या शेतकर्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ मिळावे. रासायनीक खते व बियाण्यांचे दर कमी करण्यात यावे. घरगुती गॅस ची दरवाढ कमी करावी. पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करण्यात याव्या. जिल्ह्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. जळगांव जिल्ह्यातील विषेशत: जळगांव शहरातील रस्ते तात्काळ सुधारण्यात यावे अशाहि मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल्या आहे.
निवेदनावर आ. अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष अँड रविंद्र पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, जिल्हा महिला अध्यक्ष वंदना चौधरी, मंगला पाटील, वाल्मिक पाटील, विलास पाटील, रिंकू चौधरी, कल्पना पाटील, सुनील माळी, गौरव वाणी, रेखा जाधव आदींच्या सह्या आहेत.