यावल ( प्रतिनिधी ) – पाण्याची मोटरीची पिन लावतांना विजेचा प्रवाह उतरल्याने धक्का लागून एकाचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना यावल तालुक्यातील शिरसाड या गावात घडली. यावलच्या पोलीस स्टेशनला झाली अकस्मातमृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गलीराम रामदास धनगर वय ४५वर्ष राहणार भोलेनाथ नगर शिरसाड तालुका यावल हे रविवार २८ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहात असलेल्या घरातील पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी पीन जोडणीस गेले असता मोटारी पिन मध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने त्या पिन मधून आल्याने त्यांना विजेचा तिव्र धक्का लागला, दरम्यान त्यांना गलीराम धनगर यांना तात्काळ रूग्णवाहिकेतुन उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहीनी भुगवाडया यांनी त्यांना मयत घोषीत केले.
याबाबत मयताचा शालक जितेन्द्र पांडुरंग धनगर (वय ३०, रा. शिरसाड ता.यावल) यांनी यावल पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे.