जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील समता नगरातील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भरत रमेश आंबेकर (वय-४०) रा. समता नगर,जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. भरत हा पत्नी सविताबाई व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २८ जुलै रोजी भरतची पत्नी सविताबाई ह्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले शाळेत गेले होते.
त्यामुळे घरी कोणी नसताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले.
याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सविताबाई आणि कल्पेश व किरण हे दोन मुले आहेत.