मयत जळगाव ,समतानगर येथील रहिवासी
जळगाव (प्रतिनिधी) – शिरसोली जवळील बुधली धरण येथून जवळ असलेल्या दर्ग्यावर दर्शनाला गेलेल्या १६ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दि. २८ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडल्याचे दिसून आले आहे. सदर मुलगा समता नगर येथील असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
जळगाव शहरातील समता नगरातील अमोल ज्ञानेश्वर भालेराव ( वय १६ ) हा काही मित्रांसोबत संध्याकाळी शिरसोली प्र.बो. शिवारातील बुधली धरणा जवळील दर्ग्यावर दर्शनासाठी गेले होते. काही वेळानंतर त्या ठिकाणी असलेल्या धरणात पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. आजूबाजूचे नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारात दाखल केले. त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
अमोल भालेराव हा आई, वडील आणि लहान भाऊ याच्यासह वास्तव्याला आहे. अमोल हा दहावीचे शिक्षण घेत होता तर भाऊ कोमल नववीत शिकत होता. आज गुरूवारी २८ जुलै रोजी दुपारी मित्रांसह तालुक्यातील शिरसोली प्र.बो. शिवारातील बुधली धरणावर दर्ग्यावर दर्शनाला गेला होता. मयत अमोलचे वडील हे महापालिकेत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यीची नोद करण्याचे काम सुरु होते.