जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कंत्राटी सुरक्षा रक्षक पदासाठी भरती करण्यात आलेली नाही किंवा होणार देखील नाही त्यामुळे भरतीचे अमिष दाखवून कोणीही कोणाही मार्फत पैशांची मागणी करीत असेल तर आमिषाला बळी न पडता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी. जमादार यांनी केले आहे .
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कंत्राटी सुरक्षा रक्षक पदासाठी भरती सुरू असल्याच्या अफवा पसरविण्यात येत आहेत.अशा प्रकारची कोणतीही भरती आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेली नाही व होणार देखील नाही .कोणीही या प्रकारची भरती होणार असल्याची अफवा पसरवून पैशाची मागणी करीत असेल किंवा भरतीच्या नावाखाली बेरोजगार उमेदवार त्यांचे नातेवाईक किंवा त्रयस्थ व्यक्तींना गंडविण्याचे प्रकार कोणा मार्फतही घडलेले असतील तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार देऊन फसवणूक टाळावी व अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी कळविले आहे.