जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव रेल्वे स्थानक परिसरात तरूणाला काहीही कारण नसतांना अज्ञात सात ते आठ जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार २२ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी रात्री उशीरात शहर पोलीस स्टेशनला अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती वरून, लक्ष विजय ठाकूर (वय-१८) रा. आसली गाव, उल्हास नगर हा तरूण सोमवारी २२ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आलेला होता. दरम्यान, शहरातील काही टवाळखोर सात ते आठ जणांनी काहीही कारण नसतांना तरूणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत लक्ष ठाकूर याला तरूणाला दुखापत झाली. हल्लेखोरांना मारहाण करत जिवेठार मारण्याची देखील धमकी दिली. याबाबत तरूणाने शहर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला रात्री उशीरा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहे.