चुंचाळे बोराळे.ता.यावल (प्रतिनिधी)- बऱ्याच दिवसा पासून अनेक भागातील पथदिवे व हायमास्ट बंद पडलेले आहेत, ते पथदिवे तर ग्रामपंचायतीने बसवले आहेत, मात्र दिवाबत्ती सुरु करण्याकडे सरपंचासह ग्रामसेवकांचे दुर्लक्ष होत आहे, तसेच चुंचाळे व बोराळेमध्ये खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मिनी हायमाँस्ट पोल बसवीण्यात आले आहे, मात्र त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे भिम आर्मीचे जिल्हा सचिव सुपडु संदानशिव यांनी सांगितले आहे. गावासह परिसरात संध्या पावसाचे गेल्या आठ दिवसापासून सततधार सुरु आहे. हायमास्ट पोल व गावातील खांबावरील पथदिवे हे बंद असाल्याने महिला व लहानमुलाना सरपटनाऱ्या प्राण्याचा धोका होऊ शकतो व प्रसगी आपला जिव देखील गमवावा लागु शकतो तरी गावातील पथदिवे व हायमाँस्ट पोल त्वरीत सुरु करण्यात यावे व नागरिकांच्या जिवाशी होणारा खेळ कुठेतरी थाबवावा असे ते म्हणाले आहे.
गावात लाखो रुपये खर्च करुन महिलांसाठी सार्वजनिक शौच्छालय बांधण्यात आलेले आहेत,त्यांना एक वर्ष उलटून देखील तेथे लाईट आलेली नाही किव्वा तेथे देखील पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत, तर लवकरात लवकर ग्रामपंचायतीमार्फत महिलांचे सार्वजनिक शौालयासाठी पथदिवे बसविण्यात यावेत व गावातील पथदिवे व हायमास्ट लवकर दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी भिम आर्मी ने केलेली आहे.

महिलांचे सार्वजनिक शौचालयात पथदिवे बसविण्यात आले, तर महिला रात्री शौचालयाचा वापर करतील लाईट न बसवल्यामुळे महिलांना रस्त्यावरती प्रात विधीस बसावे लागत आहे, त्यामुळे गावात रोगराई पसरत आहे पुढे चालत मोठ्या प्रमाणात गावात रोगराई पसरू शकते आणि मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते आणि या साठी स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत जबाबदार राहील, त्यामुळे तेथे पथदिवे बसविण्यात आले पाहिजे नाही तर भीम आर्मी संविधानिक मार्गाने आंदोलन करेल असे भिम आर्मी भारत एकता मिशनचे जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी सांगितले आहे.








