जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यांत पंचायत समिति , जिल्हा परिषद निवडणुका प्रहार जनशक्ति पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे तालुकाध्यक्ष प्रदीप गायके यांनी आज पत्रकार परिषदमध्ये उत्तरं महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्या आदेशाने जाहीर केले.
पंचायत समिती , जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात आज भगिरथी ओसवाल मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदीप गायके यांनी सांगितले की प्रहार जनशक्ति पक्ष आज सत्तेच्या माध्यातून जनहिताची कामे करत असुन जलसंपदा व शिक्षणं राज्यमंत्री बच्चू कडू , प्रदेश अध्यक्ष अनील गावंडे, उत्तरं महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी विस्तारासाठी कार्यतत्पर आहेत ग्रामीण विकासाचा कणा असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त कसे वाढवता येतील यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने कंबर कसली आहे तशी रणनीती आखली आहे . उपेक्षित घटकाला कसा न्याय देता येईल अशा पद्धतीने निवडणुक लढणार असून युवक, युवती, शेतकरी , कष्टकरी यांना निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीत्व देण्याचा पक्षाचा संकल्प आहे
आज आम्ही सत्ता पक्षात आहोत वरिष्ठ पातळीवरून आघाडी किंवा युती चा निर्णय झाल्यास तो आम्हास मान्य असेल परंतु युती किंवा आघाडी नाही झाली तर आमची तयारी असावी याच उद्देशाने आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तीस वर्षापासून जामनेर पंचायत समिती व जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपाची सरशी आहे याच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी थोड्याफार जागा घेऊन विरोधी पक्षात आहे परंतु सत्ताधारी यांनी भ्रष्टाचाराचा अगडबम उभा केला आहे तर अपुरी ताकद काँग्रेस-राष्ट्रवादीची त्यांना रोखण्यात कमी पडत आहे अशावेळी जामनेर तालुक्यातील जनता सक्षम तिसरा पर्याय शोधत आहे आम्ही तालुक्यातील युवकांना आवाहन व आश्वस्त करतो कि आपण प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा , असेही ते म्हणाले .
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे वाघारी बेटावद गटातील वडगाव टिग्रा येथील प्रमुख कार्यकर्ते सागर चौधरी , डोहरी तांडा येथील भाजपा कार्यकर्ते अनिल तवर , नेरी गटातील देव पिंपरीचे उमेश कोळी यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला चिंचखेडा तवा येथील भाजपचे गजानन वाघ व लहासर येथील भाजपाचे बुथ प्रमुख अजय शिंदे यांनीही प्रहार जनशक्ती पक्ष सोबत पुढील राजकीय कारकीर्द सुरू केली आहे
पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज कुमार महाले यांनी सांगितले की युवकांची ऊर्जा एखाद्या राजकीय नेत्याच्या चुकीच्या कामासाठी किंवा त्याचे लागुल चालन करण्यासाठी न वापरता ती कासासाठी कशी वापरता येईल त्याच उत्तम आदर्श प्रहार जनशक्ति पक्ष उभा करणार आहे .