यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील किनगाव येथील मुख्य बाजारपेठेच्या प्रमुख रस्त्यावर मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे . हा खड्डा तात्काळ बुजवण्याची मागणी किनगावच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे . .
. किनगाव गावातील नायगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महा मार्गावरील मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला असुन या खड्डयामुळे कुठल्याही क्षणी गंभीर दुर्घटना होवु शकते , किनगाव शहरातुन जाणाऱ्या या रस्त्यावरून किनगाव ते नायगांव ये जा करणाऱ्या नागरीकांची नेहमीच वर्दळ असते , हा खड्डा मुख्य रस्त्यावर किनगाव तडवी वाडा तेथे एका गटारी वरचाधाप्याचा भाग खुप दिवसापासून तुटलेला आहे. परंतु याकडे ग्रामपंचायतसह सार्वजनिक बांधकाम विभागाचेही लक्ष नाही. हा खड्डा चुकवितांना किंवा अंदाज चुकल्याने वाहनधारकांचे रोज या ठीकाणी छोटेमोठे अपघात होत आहेत. या सर्व प्रकारामुळे संबधीत अधिकारी हे तिथे कुणाचा तरी मोठा अपघात होण्याची तर वाट पाहत नाही ना! असे नागरीकांना वाटत असल्याने चिंता वाढली आहे . संबंधितांनी लवकर उपाय योजना केल्या पाहिजेत अशी मागणी हिंदवी स्वराज्य सेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केली आहे.