जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात जामनेर , पाळधी की कोथळीची सत्वपरीक्षा ? हा सध्या गांभीर्याने चर्चेत आलेला मुद्दा आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे या चर्चेचे केंद्रबिंदू आहेत .
विधान परिषदेला सर्व गुप्त मतदान करतात त्यामुळेच मुक्ताईनगरचे मतदान स्थानिक नेत्यांमध्ये विळ्या – भोपळ्याचे नाते असल्याने कोथळीला मिळण्याची शक्यता कमी असल्याचा एक सूर या चर्चेत आहे
भुसावळकरांसाठी कोथळीच्या सांगण्यावरून जिल्हा बँकेत रमण यांनी ‘ भोळेपणाचा ‘ आव आणत माघार घेतली . रावेरमध्ये भुसावळच्या चौधरी (बंधू मधील एक) दुसऱ्या चौधरीनां शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून वारे रावेरमधून कोथळीकडे वाहत आहे.जळगावचा समाज एक असला तरी मध्यंतरीच्या काळात राजू मामा आणि नाथा भाऊंचे फाटले होते.म्हणूनच कोथळीला मत मिळेल का ? हे प्रश्नचिन्ह आहे. अर्थात पंचायतही निर्णय बदल करून ‘ भोर ‘ करू शकते.
पारोळ्याचे वारे व्हाया पाळधी असेल तरी पाळधीचे वर्चस्व घटवण्यासाठी व डॉक्टरचा काटा काढण्यासाठी कोथळीची वारी होण्याची दाट शक्यता आधीपासूनच व्यक्त होत आहे . चोपडाला व्यवहार ज्ञान व न्याय उत्तम कळते जामनेरवासियांनी पाचोराच्या वाघाला डिवचण्यासाठी शिंदेनां पुढे केले. त्यामुळेच वाघ नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. चाळीसगावचे कमळ अबाधित असल्याने तेथे घड्याळाची टिकटिक वाजणार नाही
पाळधीची फिल्डिंग व्हाया पहूर जामनेरशी नेत काही मुद्दे उत्तम असल्याने कोथळीला आव्हान देण्यासाठी दोन विरोधक विचार करीत असावेत असे सध्या तरी चित्र आहे.
अमळनेरचे नेते पक्ष शिष्टाचार सोडून इतरांना मदत करणे शक्य नाही म्हणजेच गोळाबेरीजमध्ये भाजप-शिवसेनेतील तीन मत घड्याळाला ऊर्जा देतील असे सध्याचे चित्र आहे.कारण यानंतरची पार्टी दूध संघात रंगणार आहे.
माहत्वाच्या पीएचे फोन बंद असले व मतदार हॉटेलमध्ये बंदीस्त असले तरी त्यांची जमाबंदीची कामे करणारी सुवर्णदालने खुली आहेत .