जळगाव ( प्रतिनिधी ) – जुन्या भांडणावरून महिलेच्या घरातील रोकडसह मंगलपोत व दागिने असा २ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रचना कॉलनी येथे आशाबाई गोपाल चौधरी (वय-४२) कुटुंबियांसह राहतात . १५ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणावरून सुनील रसाळ राठोड, संजय रसाळ राठोड ( रा. कासमवाडी ) , विशाल पदमसिंग परदेशी ( रा. कुसुंबा) आणि रुपेश संजय सपकाळे ( रा. कांचन नगर) यांनी महिलेच्या घरात घुसून मारहाण केली घरातील सामानांची तोडफोड केली. घरात ठेवलेले १ लाख रूपयांची रोकड आणि मंगलपोतसह दागिने असा २ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुनील राठोड, संजय राठोड विशाल परदेशी आणि रुपेश सपकाळे या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.