यावल ( प्रतिनिधी ) – एका गावात ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या सांगण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्य महिलेचा विनयभंग करणाऱ्या ८ आरोपींच्या विरोधात १४ मे रोजी रात्री यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ मेरोजी पीडित महीला ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या घेवून गेली होती. यावेळी ग्रामपचायतमध्ये हजर असलेले नितीन चौधरी, देविदास कोळी, शिपाई धनराज चौधरी, लिपिक मोहन बाविस्कर, विशाल तायडे, सुभाष तायडे, विजय चौधरी, संदेश पाटील यांनी पाण्याची समस्या ऐकुन न घेता महीलेची छेड काढत विनयभंग केला. यावल पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.