एरंडोल तालुक्यातील टोळी येथे घटना
एरंडोल (प्रतिनिधी):- तालुक्यातील टोळी येथे एका १४ वर्षीय मुलाने राहत्या घराजवळील पत्राशेडमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. निलेश सुरेश पाटील असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निलेश सुरेश पाटील (वय १४, मूळ रा. करवंद, ता. शिरपूर, जि. धुळे) हा सध्या एरंडोल तालुक्यातील टोळी येथे वास्तव्यास होता. ७ जानेवारी रोजी त्याने अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घराजवळ असलेल्या पत्राशेडमध्ये गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निलेशने इतक्या लहान वयात टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर भिका शिंदे करीत आहे.









