जळगाव(प्रतिनिधी)- सोमवारी करोनाबाधित रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसांनंतर 500 च्या आता आली असून कभी खुशी कभी गम अशी स्थिती अहवालावरून दिसून येत आहे. जिल्ह्यात 451 रुग्ण बाधित आढळले तर 712 रुग्ण बरे होऊन परतले. त्यामुळे चिमूटभर दिलासा मिळाला असला तरीही मृत्यू मात्र 19 झाले असल्याने चिंतेत भर पडली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील 57, जळगाव ग्रामीण 19, भुसावळ 48, अमळनेर 66, चोपडा 67,पाचोरा 07, भडगाव 05, धरणगाव 19, यावल 22, एरंडोल 20, जामनेर10, रावेर 06 , चाळीसगाव 82, मुक्ताईनगर 10, बोदवड 06, इतर जिल्ह्यातील-07, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 39287 इतकी झाली आहे. आज 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 990 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 9836 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.