जळगाव ( प्रतिनिधी ) – पाच लाख रूपये माहेरहून आणावे म्हणून विवाहितेचा छळ व मारहाण करणाऱ्या सासरच्या ४ आरोपींविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
शहरातील विवेकानंद नगरातील माहेर असलेल्या राधिका देवेंद्र तायडे (वय-३२) यांचा विवाह जळगावातील दिक्षित वाडी येथील देवेंद्र किशोर तायडे यांच्याशी झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. नंतर पती देवेंद्र याने पत्नीला माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही म्हणून पतीसह सासू, सासरे, दिर यांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. १२ जून रोजी विवाहितेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पती देवेंद्र तायडे, सासू सविता तायडे, सासरे किशोर तायडे आणि दीर पंकज तायडे ( सर्व रा. वानखेडे, सोसायटी, दिक्षीत वाडी) यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना अलका शिंदे करीत आहेत.