मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरूणीने 2006 मध्ये बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र अशातच मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. 2006 पासून 2020 पर्यंत का शांत बसला?, बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो. संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका. तुमच्या मुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही. याची एक महिला म्हणून लाज बाळगा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.







