जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आसोदा आणि करंज येथील विहिरीतील विद्यूत पंपाची चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना जळगाव तालुका पोलीसांनी अटक केली आहे. तिघांवर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसोदा येथील ग्रामपंचायत मालकीच्या गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतून अज्ञात चोरट्यांनी केबल व विद्यूत पंपाची चोरी केली होती. दुसऱ्या घटनेत करंज येथील शेतकरी संजय सपकाळे, शंकरलाल सोनवणे, भगीरथ सोनवणे आणि रविंद्र पाटील या चार शेतकऱ्यांच्या शेतातून ४ मार्च रोजी विद्यूत पंप आणि केबल चोरून नेली होती. या दोन्ही घटनेबाबत जळगाव तालुका पोलीसात नोंद करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यातील जितेंद्र बारेला, जितेंद्र कोळी आणि अविनाश भील ( सर्व रा. अट्रावल ता. यावल ) या तीन संशयित आरोपींना तालुका पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १० हजार ८५० रूपये किंमतीची २५ किलो कॉपर वायर हस्तगत केली आहे.