जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चिंचोली गावठाणाच्या हद्दीतील अतिक्रमणाच्या वादात ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धुमाळ यांचे अपील नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी फेटाळले आहे . जिल्हाधिकाऱ्यांनी आधी दिलेला निर्णय कायम ठेवण्यात आला आहे
नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामपंचायत अपिल क्रमांक २७/२०२२ मध्ये अपिलार्थी प्रविण धुमाळ (सदस्य , ग्रामपंचायत चिचोली ता.जि. जळगांव ) हे होते . चिंचोलीचे ग्रामसेवक संजय वराडे यांनाही प्रतिवादी करण्यात आले होते . महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १६ च्या याआधारावर हे अपील दाखल करण्यात आले होते
अपिलार्थी प्रविण धुमाळ यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे दाखल प्रकरण न १९२/२०२१ मध्ये १६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(ग) व १४(१) (-३) अन्वये दिलेल्या आदेशाविरुद्ध २८ फेब्रुवारीरोजी प्रस्तुत अपिल दाखल केले . प्रथम सुनावणी २५ मार्चरोजी निश्चित करण्यात आली. दोन्ही पक्षकारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देऊन २९ एप्रिलरोजी प्रकरण गुणवत्तेवर निर्णयासाठी बंद करण्यात आले.
संजय वराडे यांनी अपिलार्थी धुमाळ यांचे विरुध्द जिल्हाधिकारी याचे कोर्टात ग्रामपंचायत प्रकरण नं. १९/२०२१ दाखल केलेले होते. सुनावणी होऊन
अपिलार्थी यांचे विरुद्ध बेकायदेशीर आदेश पारित करण्यात आलेला आहे , असे धुमाळ यांचे म्हणणे होते .
धुमाळ यांनी ग्रामपंचायत सरकारी गांवठाण जागेत स्वतःच्या व आई वडील आणि भावाच्या नावे अतिक्रमण केले असल्याचे बेकायदेशीर निरीक्षण नोंदवून बेकायदेशीर आदेश पारित केलेला आहे. अपिलार्थी यांनी कोणत्याही सरकारी जागेवर अतिक्रमण केलेले नाही. या गावचे सि.स.न. मोजणी झालेली आहे. ग्रामपंचायतीचे नमुना नं. ८ रजिस्टर दुरुस्त झालेले नाही, त्यामुळे ग्रामपंचायत नमुना नं. ८ रजिस्टर घर तळजागेची सरकारी मोजणी न करता, गटाची मोजणी अंती खात्री न करता, चुकीचे सरकारी गट नंबर बाबत शेरे कोणत्याही पुराव्याशिवाय नमूद करण्यात आलेले आहेत. सामनेवाले यांनी अपिलार्थी यांचे विरुध्द खोटेनाटे प्रतिज्ञापत्र रमेश धुमाळ व मिलीद खैरनार हे राजकीय विरोधक असल्याने व रमेश धुमाळ हे पूर्वी अपिलार्थी विरुद्ध निवडणुक हरल्याने त्यांनी राजकीय विरोधापोटी कोणतेही सरकारी भोजणीचे पुरावे नसताना, खोटे प्रतिज्ञापत्र राजकीय आकसापोटी केलेले आहे. घ.नं. ७३९ ग्राहक क्रमांक ११०३८३००७९६८ च्या पत्त्यात बदल करून त्यांनी खरेदी केलेल्या घराचा नवीन पत्ता देण्याचे अपिलावचे प्रयोजन काय १ सदर बाबी या संदिग्ध स्वरूपाच्या असून या विषयी अपिलार्थी यांच्या लेखी युक्तीवादावरुन सदर बाबी स्पष्ट झालेल्या नाहीत. ग्रामसेवक यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादात मालमत्ता क्रमांक
७३८ व ७३९ हे खाजगी मिळकत स.न. १८३ ग.नं. २८१ यात आहे. सदर मिळकत ग्रामपंचायतीच्या मालकीची नाही. ग्रामपंचायतीकडे मिळकत मोजणीचे पुरावे नाही. त्यामुळे सदर ग.नं. ७३८ व ७३९ हे शासकीय जमीनीवर अतिक्रमण असल्याचे ठामपणे सांगता येणार नाही असा मोघम स्वरुपाचा खुलासा दाखल केला आहे.
उपरोक्त बाबी विचारात घेता जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमाक १९/२०२१ अन्वये पारित केलेल्या आदेशातील निष्कर्ष योग्य असल्याने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता दिसून येत नाही असे भानुदास पालवे ( अपर आयुक्त, नाशिक विभाग ) यांनी जरी केलेल्या आदेशात म्हटले आहे .