जामनेर ( प्रतिनिधी ) – पोलिसांची ड्युटी आठ तासांची करा अशी मागणी करणारे निवेदन आज पोलीस मित्र संघटनेने जामनेरच्या तहसीलदारांना दिले .
पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या विचार करण्याची गरज आहे.त्यांना योग्य विश्रांतीची गरज आहे. सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडते . शासनाने पोलिसांची ड्युटी आठ तासाची करण्याचा निर्णय घेण्याची मागणी पोलीस मित्र संघटनेने केली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावतात. कुटुंबासोबत सण आणि इतर सुखाचा वेळ देऊ शकत नाहीत.
समाजातील काही लोक पोलिसांकडे संशयी नजरेने पाहतात. अशा लोकांनी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. ताणामुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यांना कुटुंबियांना जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी पोलिसांमुळे जनता सुरक्षित आहे पण पोलिसच असुरक्षित आहे. असे या संघटनेचे म्हणणे आहे या निवेदनाच्या प्रती राज्यपाल , मुख्यमंत्री ,. उप मुख्यमंत्री , गृहमंत्री , पोलीस महासंचालक यांनाही देण्यात आल्या आहेत .