नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) – भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माला सुप्रीम कोर्टाने देशाची माफी मागण्यास सांगितलीये. खटला दाखल करण्याची याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.
नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. नुपूरच्या बदलीच्या अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तिच्या वक्तव्यामुळे देशभरातील लोकांच्या भावना भडकल्या आहेत. आज देशात जे काही घडत आहे त्याला ते वक्तव्य जबाबदार आहे. आम्ही डिबेट पाहिली, चिथावणी देण्याचा प्रयत्न केला गेलाय, असे न्यायालयाने म्हटले. पण त्यानंतर त्यांनी जे काही म्हटलंय ते अधिक लज्जास्पद आहे. नुपूर शर्मा आणि तिच्या वक्तव्याने संपूर्ण देश पेटवून दिला आहे. उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला त्या जबाबदार आहेत. नुपूर शर्माने टीव्हीवर येऊन माफी मागावी असंही न्यायालयाने म्हटलंय.
वकिलाने माफीनामा आणि पैगंबरांवर केलेली टिप्पणी नम्रतेने मागे घेण्याची विनंती केली तेव्हा खंडपीठाने सांगितले की मागे घेण्यास खूप उशीर झाला. या तक्रारीवरून एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. मात्र अनेक एफआयआर असूनही त्यांना दिल्ली पोलिसांनी अद्याप हातही लावलेला नाही.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी नुपूर शर्मा यांनी सर्व प्रकरणे दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जावे. त्यांनी याचिका मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.