भाजपने निवडणूकपूर्व प्रचाराचे साधले टायमिंग
जळगाव (प्रतिनिधी) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी दि. ५ मार्च रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर व त्यात जळगावात आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा आहे. या दौऱ्यात अमित शाह यांची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीवर अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह यांनी घराणेशाहीवरुन सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना आपला मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असे म्हणत परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित युवकांना केला.
आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार या निमित्ताने भाजपाकडून करण्यात येत आहे. भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोचहविण्यासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले. परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? असा प्रश्न त्यांनी युवकांना केला. विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. राज्यात ३ चाकाची महाविकास आघाडीची ऑटो चालते, तिचे तिन्ही टायर पंक्चर झाले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या. १ लाख मुलं डॉक्टर बनतील, असे अमित शाह म्हणाले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ११ व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ५ व्या क्रमांकावर पोहचली आहे. आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटी असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. तुम्ही नोकरीला जाणार तिथे तुमचा बायोडाटा बघितला जाणार की नाही? मग पंतप्रधान बनविताना तुम्ही बायोडाटा बघणार की नाही बघणार? १० वर्षांचा अनुभव आणि पुढील २५ वर्षांचे व्हिजन आहे, असा नेता पुन्हा पुन्हा होत नाही. मुद्रा लोण दिले, स्टार्टअप दिले, डिजीटल व्यवहार झालेत, रेल्वे ट्रॅक बनविले, रोज गॅस सिलिंडर ५० हजार लोकांना दिले. गरिबीतून लोकांना बाहेर काढले. प्रत्येक घरात पाणी पोहोचण्याचे काम केले, असे अमित शाह यांनी सांगितले.
महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसमोर लोकसभा निवडणुकीत आव्हान उभं केलं आहे. आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार या निमित्ताने भाजपकडून करण्यात येत आहे. भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोहचवण्यासाठी भाजपला साथ द्या,” असं आवाहन शाह यांनी उपस्थित नागरिकांना केलं आहे.