जळगाव ( प्रतिनिधी ) – वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे ४ द्वारे २० से.मी. ने उघडण्यात आले आहेत, त्याद्वारे २७०० कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे. कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
वाघुर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाघूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असुन आधी वाघूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले. शनिवारी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली लावल्याने वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी धरणाचे ४ दरवाजे २० सें.मी. ने उघडण्यात आले. धरणातून २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असून, कोणीही नदीपात्राजवळ जाऊ नये. असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.