चोपडा तालुक्यातील वडधा गावातील नदीच्या काठावर मिळाला मृतदेह
प्रशासनाकडे ‘केसरीराज’ने केला होता यशस्वी पाठपुरावा
जळगाव (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील शेतकरी पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी तापी नदीच्या काठावर गेला होता. मात्र त्याचवेळी त्याचा पाय घसरून तो नदीमध्ये बुडाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. प्रशासनाने देखील प्रयत्न केले. यासाठी “केसरीराज” ने देखील पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर आज रविवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ४८ तासांनी त्याचे प्रेत चोपडा तालुक्यातील वडधा या गावातील तापी नदीच्या काठावर मिळाले आहे. नातेवाईकांनी ओळख पटवली आहे.
मनोज भाऊलाल पाटील वय 42 असे या शेतकऱ्याचे नाव आहे पोळ्याच्या दिवशी हा शेतकरी तापी नदीच्या काठावर बैल धुण्यासाठी केला होता थोरगव्हाण येथील गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी प्रशासनाकडे केसरीराजने देखील पाठपुरावा केला होता . याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पियुष रावळ यांच्यासह यावल तहसीलदार गावाचे तलाठी पोलीस पाटील हे देखील त्यांच्या शोधावर होते त्यांनी सर्व ठिकाणी संदेश पाठवले होते थोरगव्हाण जवळच्या तापी नदीच्या काठावरती बुडून मृत्यू पावल्याची ही चौथी घटना आहे या ठिकाणी धोकादायक म्हणून बोर्ड लावणे तसेच इतर उपाययोजना करण्याची गरज आता ग्रामस्थांमधून वर्तवली जात आहे.
मनोज भाऊलाल पाटील यांचा मृतदेह अखेर आज रविवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील वडधा या गावी तापी नदीच्या काठाजवळ वाहून आलेला गावकऱ्यांना दिसून आला आहे याबाबत नातेवाईकांनी ओळख पटवली आहे शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे